Supriya Sule vs Pankaja Munde : राज्यात गुन्हेगारीच्या घटना सर्वच जिल्ह्यांमध्ये घडत आहेत. गुन्हेगारी घटना थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गुन्हेगारी घटनांवर राजकारण होता कामा नये. मात्र परळी, बीडलाच बदनाम केलं जातंय, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपा आमदार पंकजा मुंडे यांनी काल (११ जानेवारी) दिली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेवर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रक्रिया दिलं आहे. त्या बुलढाण्यात पत्रकारांशी बोलत होत्या.
Supriya Sule vs Pankaja Munde काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी च्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “परभणी व बीड या दोन्ही घटना माणुसकीला काळीबा फासणाऱ्या आहेत. राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी संसदेत पहिल्यांदा महाराष्ट्राच्या वतीने परभणी आणि बीडप्रकरणी आवाज उठवला. आमदार संदीप क्षीरसागर,आमदार सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, नामिता मुंदडा, अजित पवारांचे आमदार सोळंके यांनी विधानभवनात हा मुद्दा मांडला.
ही अत्यंत क्रूर आणि गलिच्छ घटना झाली आहे. यात राजकारण आणू नये माणुसकीच्या नात्याने परभणीला न्याय देण्याची मागणी करतेय. या संघर्षाच्या आणि अडचणीच्या काळात ३३ दिवसां नंतरही अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. सातत्याने प्रश्न मांडले जात आहेत, त्याचे उत्तर येत नाही. अजूनही एक आरोपी फरारच आहे. वाल्मिक कराडला ईडीची नोटीस पाठवली तरीही कारवाई झाली नाही. त्याच्यावर मकोका लावण्यात आला नाही. तो अटकेत आहे, पण त्याची अटक कशी झाली? तो शरण आला. ही चेष्टा लावली आहे का?”
Supriya Sule vs Pankaja Munde राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया आमदार पंकजा मुंडे यांच्या विष दिलं आहे. बीड आणि परभणीत घटनांवर राजकारण न करता मा नात्याने न्याय मिळवण्याची मागण वाल्मिक कराडच्या कृतीमुळे बी असल्याचं त्यांनी सांगितलं. दोषीन
वाल्मिक कराडच्या कृतीमुळे बीड बदनाम
“आम्ही माणुसकीच्या नात्याने उभे आहोत. जोपर्यंत या दोन्ही कुटुंबांना न्याय मिळत नाही, आम्ही माणुसकीच्या नात्याने स्वस्थ बसणार आहे”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्या विधानाविषयी विचारलं. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कोणताही जिल्हा व्यक्तीमुळे नाहीतर कृतीमुळे बदनाम होतो. वाल्मिक कराडच्या कृती आणि कामाच्या पद्धतीमुळे जिल्हा बदनाम होत आहे.”
Supriya Sule vs Pankaja Munde तसंच, वाल्मिक कराड आणि त्यांच्यासोबत जी कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी ही हत्या केली असेल त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे”, अशी मागणीही त्यांनी केली.