ladki bahin yojana; माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही..

Ladki bahin yojana: राज्यातील विरोधकांनी किती मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण केला तरी! देखील राज्य शासनाची महत्त्वपूर्ण असणारी योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करणार नसल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. महिलांनो काळजी करू नका मी तुमच्यासाठी 45000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. त्यामुळे राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांनी निश्चित रहावे. असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वसमत या ठिकाणी दिलेला आहे.

Ladki bahin yojana

राज्य सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक प्रोस्थाहन देण्यासाठी राज्यामध्ये Ladki bahin yojana लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेचे अंतर्गत महिलांना महिन्याला पंधराशे रुपये एवढा निधी वितरित केला जातो. या योजनेच्या नियम अटीच्या अनुषंगाने राज्य शासनाने यामध्ये तपासणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनेक अर्ज बाद ठरवण्यात आले. या अनुषंगानेच विरोधकांनी सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याबाबतची टीका सरकारवर केली. विरोधी पक्षाकडून सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याची टीका करण्यात येत आहे. सरकारने लाडके बहिणींना धोका दिला आहे असे वक्तव्य विरोधकाकडून केले जात आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Ladki bahin yojana काय म्हणाले अजित पवार

दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी वसमत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. हा मेळावा प्रसाद मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडला. या मेळाव्या दरम्यान बोलताना राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले की लाडकी बहीण योजनेसाठी 45 हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. ज्यामुळे योजना बंद होणार नसल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली आहे. विरोधकाने कितीतरी आरडाओरडा केला तरी सरकार कोणतीही योजना बंद पडू देणार नाही किंवा बंद करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हे पण वाचा:
Pm kisan Pm kisan पी एम किसान योजनेचा 20 वा हप्ता जूनमध्ये.

का होतेय सरकारवर टीका

महाराष्ट्र राज्य शासनाने जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेमध्ये अनेक महिलांनी अर्ज सादर केले. शासनाने शासन निर्णय निर्गमित करतानाच या योजनेच्या नियम व अटी प्रसिद्ध केल्या होत्या. परंतु अनेक महिलांनी पात्र नसताना देखील या योजनेमध्ये अर्ज सादर केले होते. सरकारकडून अर्ज सादर केल्यास सर्वच महिलांना आतापर्यंत निधी वितरित करण्यात आला होता. परंतु निवडणुका पूर्ण झाल्यानंतर सरकारने या अर्जांची तपासणी प्रक्रिया सुरू करून अनेक महिलांना या योजनेमधून वगळण्याचे काम पूर्ण केले आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपत्र असणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळले आहे. ज्यामध्ये ज्या महिलांच्या नावावर चार चाकी वाहन उपलब्ध आहे किंवा ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे. तसेच ज्या महिला इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवत आहेत. अशा अपात्र असणाऱ्या महिलांना या योजनेमधून वगळण्यात आले आहे.

या महिलांना वगळल्यामुळे विरोधकाकडून निवडणुकीपूर्वी लाडकी असणारी बहीण आता सावत्र कशी झाली असा प्रश्न निर्माण केला जात आहे. विरोधकाकडून ही योजना फक्त निवडणुकीपुरतीच असल्याचे देखील वक्तव्य केले जात आहे. आता राज्य शासन योजना बंद करणार आहे असा संभ्रम महिलांच्या मनात निर्माण केला जात आहे. ज्यामुळे अनेक महिलांना योजना बंद होणार असा प्रश्न देखील पडत होता.

हे पण वाचा:
irrigation system irrigation system : क्षारयुक्त पाण्यामुळे शेतीला काय तोटा होतो.

विरोधकाकडून निर्माण केलेला संभ्रम आणि महिलांच्या मनात निर्माण होणारी चिंता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याने आता योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या शब्दांनुसार लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने निधी तरतूद करून ठेवलेला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनाच नाही तरी तर कोणतीही योजना शासन बंद करणार नाही किंवा बंद पडू देणार नाही असा शब्द यावेळी अजित पवार यांनी दिला आहे.

हे पण वाचा:
Crop loan Crop loan: पिक कर्ज वाटप सुरू! या शेतकऱ्यांना मिळते कर्ज!

Leave a Comment