farmer pashu yojana : शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांवर निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागते. ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न खाली येते. अशा या संकटांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतीपूरक व्यवसाय असणे देखील आवश्यक आहे. शेतीला जोड व्यवसाय असल्यास जरी शेतीतील पिकाची नुकसान झाले तरी पूरक व्यवसाय शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन म्हणून उपलब्ध राहते.
शेतीपूरक आणि शेती जोड व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीस चालना मिळते. अशाच शेतीपूरक व्यवसायामध्ये शेळीपालन हा देखील प्रमुख व्यवसाय अनेक शेतकरी करत आहेत. यासाठीच राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना शेतीपूरक व जोड व्यवसाय करण्यासाठी राज्यात नाविन्यपूर्ण पशुसंवर्धन योजना सुरू केली. योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना शेळ्या मेंढ्या गाय म्हैस अशा पाळीव प्राण्यांचे वाटप केले जाते. पात्र असणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचे अंतर्गत शेळी मेंढी गाय म्हैस पालन करण्यासाठी पशु वाटप केले जातात.
पशुसंवर्धन विभागामार्फत राबवली जाते योजना
राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण पशुसंवर्धन योजना राबवण्यात येते. नियोजनाच्या अंतर्गत 2025 मधील अर्जदेखील सुरू झालेले आहेत. राज्यातील अल्पभूधारक बेरोजगार आणि बचत गटातील महिलांना या योजनेमध्ये अधिक प्राधान्य देण्यात येत आहे.

योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये farmer pashu yojana
नाविन्यपूर्ण पशुसंवर्धन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पशुधन वाटप केले जाते. ज्यामध्ये गाय म्हैस शेळी मेंढी कुक्कुटपालन असे व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्राण्यांचे वाटप केले जाते. या योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना 50 ते 75 टक्के पर्यंत अनुदान देखील वितरित केले जाते. शेळी गटासाठी शेतकऱ्यांना दहा शेळ्या व एक बोकड या प्रमाणात अनुदान दिले जाते. मेंढी गटासाठी देखील त्याचप्रमाणे दहा मेंढ्या आणि एक मेंढ्या या प्रमाणात अनुदान दिले जाते. गाई म्हशीमध्ये दोन गाई आणि दोन म्हशी याप्रमाणे अनुदान दिले जाते.
farmer pashu yojana नाविन्यपूर्ण योजनेमध्ये शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी दोन मे 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांना यामध्ये अर्ज सादर करण्यासाठी एक जून 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.
मिळणारे अनुदान
farmer pashu yojana नाविन्यपूर्ण पशुसंवर्धन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दहा शेळ्या व एक बोकड खरेदीसाठी एकूण एक लाख तीन हजार 545 रुपये एवढा प्रकल्प खर्च प्रस्तावित केला जातो. त्यापैकी सर्वसाधारण घटकाला 50 टक्के अनुदान शासनाकडून दिले जाते. तर अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान शासनाकडून वितरित केले जाते.
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे बँक पासबुक
- रेशन कार्ड
- पासपोर्ट फोटो
- सही
- सातबारा आठ चा उतारा
- जमीन नसेल तर सहमती धारकांची करारनामा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- दारिद्र रेषेखालील प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- आपत्य प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र
- बचत गटात सदस्य असल्यास बचत गटाचे प्रमाणपत्र
- रोजगार नोंदणी केलेली असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रतेचा दाखला
- शेळीपालन याविषयी प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचे प्रमाणपत्र.
अर्ज प्रक्रिया
नाविन्यपूर्ण योजनेमध्ये (farmer pashu yojana) सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी दोन माध्यम देण्यात आलेले आहेत. शेतकरी मोबल्याच्या माध्यमातून देखील ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. त्याकरिता शेतकऱ्यांना प्ले स्टोर वरून ah.mahabms हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. या ॲपच्या माध्यमातून आवश्यक विचारलेली माहिती भरून शेतकरी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकतात. अर्ज सादर केल्यानंतर अर्जदाराला अर्ज क्रमांक प्राप्त होतो त्या क्रमांकाच्या माध्यमातून आपण आपल्या अर्जाचे स्टेटस पाहू शकतो
पोर्टलच्या माध्यमातून देखील शेतकरी अर्ज करू शकतात.(farmer pashu yojana) ज्या शेतकऱ्यांना ॲपवरून अर्ज करण्यास अडचणीत आहे असे शेतकरी शासनाने ठरवून दिले https://ah.mahabms.com/ या पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराला आपल्या आधार क्रमांक आणि पासवर्ड च्या माध्यमातून लॉगिन करावे लागते. लॉगिन केल्यानंतर आपल्याला ज्या घटकासाठी अर्ज करायचा आहे तो घटक निवडणे आवश्यक आहे. यामध्ये शेळी मेंढी गटवाटप गाय म्हैस गट व कुकूटपालन या प्रकारचे घटक आपल्याला दिसून येतील. त्यापैकी आपल्याला हवे असणारे घटकासाठी आपण अर्ज सादर करू शकता
ऑनलाइन अर्ज कसा करायचा यासाठी हा व्हिडिओ पहा
याआधी अर्ज केला असल्यास
मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांनी या घटकासाठी अर्ज सादर केला आहे त्यांना नव्याने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता नाही.(farmer pashu yojana) त्यांना त्यांच्या आधार नंबरच्या माध्यमातून लॉगिन करून दुसऱ्या घटकासाठी देखील नव्याने अर्ज सादर करता येईल. ज्यांची नोंदणी याआधी झाली आहे. त्यांना लॉगिन करण्यासाठी आपला आधार क्रमांक आणि नोंदणी करताना जो मोबाईल क्रमांक दिला होता त्या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे सहा अंक पासवर्ड म्हणून वापरावे लागतील. लॉगिन केल्यानंतर ज्या घटकासाठी आपण या आधी अर्ज केलेला आहे ते घटक आपल्याला दाखवले जाणार नाहीत. परंतु जे घटक अद्याप पर्यंत आपण अर्ज केले नाही ते घटक आपल्याला त्या ठिकाणी दाखवले जातील. आपल्या नव्याने त्या ठिकाणी अर्ज सादर करायचा असल्यास आपण निवड करून त्या घटकासाठी अर्ज सादर करू शकता.
अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची प्रत आपल्याकडे ठेवणे आवश्यक आहे. भविष्यात आपल्या अर्जाची स्थिती आणि आपली निवड प्रक्रिया झाल्यानंतर पुढील लाभ मिळवण्यासाठी आपल्याला ही प्रत आवश्यक लागणार आहे. आपल्या अर्ज क्रमांकाच्या माध्यमातूनच आपण आपली निवड प्रक्रिया देखील तपासू शकतो.farmer pashu yojana