farmer anudan update : केंद्र शासनाने सुरू केलेले ऍग्री स्टॅक योजना आता हळूहळू प्रत्येक विभागात बंधनकारक केली जात आहे. याआधी कृषी विभागाने शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकरी ओळखपत्र असणे बंधनकारक केले होते. आता त्यामध्ये महसूल विभागाने देखील शेतकरी ओळखपत्र बंधनकारक केलेले आहे. यापुढे शेतकऱ्यांना अनुदान नैसर्गिक आपत्ती अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्याकडे शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे ज्या शेतकऱ्याकडे शेतकरी ओळख पत्र असेल अशा शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मिळणारे अनुदान वाटप केले जाणार आहे.
केंद्र सरकारने देशातील सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची ओळख निर्माण करण्यासाठी एक स्वतंत्र शेतकरी ओळख क्रमांक देण्याची योजना आखली. योजनेचे अंतर्गत केंद्र शासनाने ऍग्री स्टॅक प्रोजेक्ट राबवण्यास मंजुरी दिली. या प्रोजेक्ट नुसार देशातील प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक क्रमांक दिला जाणार आहे. युनिक क्रमांकाच्या माध्यमातून शेतकऱ्याला यापुढे कोणत्याही शासकीय मदतीसाठी व अनुदानासाठी हा नंबर बंधनकारक असणार आहे.
शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय?
देशातील प्रत्यक्ष शेतकऱ्याची ओळख डिजिटल स्वरूपात करण्यासाठी शासनाने शेतकरी ओळख क्रमांक देण्याचे ठरवले. आता या ओळखपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांची डिजिटल स्वरूपात सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध केली जाणार आहे. जसे नागरिकांकडे आधार क्रमांक हा एक मिनिट क्रमांक आहे ज्याच्या माध्यमातून नागरिकांची पूर्ण ओळख पत्ता व अशी माहिती प्रसिद्ध होते. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे देखील ओळख पत्र शेतकऱ्यांची ओळख, शेतकऱ्यांच्या जमिनीचा तपशील, शेतकरी योजनांचा लाभ, जमिनीचा सातबारा आठ या सर्व घटकांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी ओळख पत्र देण्यात येत आहे. थोडक्यात शेतकऱ्यांची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी शेतकरी ओळख पत्र तयार करण्यात आले आहे.
या आधी कृषि विभागाचे केले होते बंधनकारक
शेतकरी ओळख पत्र कृषी विभागाने या आधीच बंधनकारक केलेले आहे. शासनाच्या कोणत्याही कृषी विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असणे बंधनकारकच आहे. या पद्धतीचा नियम कृषी विभागाने फेब्रुवारी 2025 मध्येच जारी केलेला आहे. त्यामुळे कृषी विभाग अंतर्गत मिळणाऱ्या कोणत्याही शासकीय योजनांचा शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळख पत्र बंधनकारकच आहे.
farmer anudan update तरच मिळेल शेतकऱ्यांना अनुदान
आता महसूल विभागाने देखील शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळख पत्र अत्यंत बंधनकारक केले आहे. शेतकऱ्यांना मदत व पुनर्विकास विभागाकडून नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीतील पिकाच्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाते. ही मदत महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पंचनामाच्या आधारे शेतकऱ्यांना वितरित केली जाते. त्यामध्ये कृषी विभागाने या आधीच शेतकरी ओळख पत्र बंधनकारक केलेले आहे.
महसूल विभागाने देखील यावर अधिकृतपणे निर्णय घेतला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने शेतकऱ्यांना शेतकरी अनुदान मिळवण्यासाठी 15 जुलैपासून पुढे शेतकरी ओळखपत्र बंधनकारक केले आहे. यापुढे ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळख पत्र असेल अशा शेतकऱ्यांना मदत व पुनर्वसन विभागाकडून मिळणारे अनुदान वितरित केले जाणार आहे. यापुढे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करताना त्यामध्ये शेतकरी ओळखपत्र असा रखाना जोडण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख पत्र या रकान्यामध्ये माहिती भरलेली असेल त्यात शेतकऱ्यांना यापुढे अनुदानाचे वाटप केले जाणार आहे.
शेतकरी ओळखपत्र कसे काढावे
शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळख पत्र असणे अत्यंत बंधनकारक केले आहे. ज्यामध्ये पीएम किसान पिक विमा नमो शेतकरी योजना कृषी यांत्रिकीकरण योजना शेती अनुदान यावर अशा विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतकरी ओळख पत्र बंधनकारकच आहे. मग आता हे शेतकरी ओळख पत्र नेमकं काढायचं कसं हा देखील अनेक शेतकऱ्यांचा मनात प्रश्न आहे. या आधीच अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतकरी ओळख पत्र देखील काढलेले आहे. परंतु अद्याप पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळख पत्र काढले नाही त्यांनी खालील व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन आपले शेतकरी ओळख पत्र काढावे. शेतकरी ओळख पत्र काढण्यासाठी संकेतस्थळ. http://mhfr.agristack.gov.in/
शेतकरी ओळखपत्राचे फायदे
संपूर्ण देशभरात शेतकरी ओळखपत्राची चर्चा सुरू आहे. प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळख पत्र बंधनकारक करण्यात येत आहे. मग या शेतकरी ओळखपत्राचे नेमके शेतकऱ्यांना फायदे काय हे देखील पाहन अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्राचे होणारे फायदे खालील प्रमाणे:-
- शेतकरी ओळख पत्र च्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक युनिक क्रमांक दिला जाणार आहे.
- युनिक क्रमांकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेती संबंधीची सर्व माहिती एकाच ठिकाणी जतन केली जाणार आहे.
- या युनिक क्रमांक च्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येक वेळी आपली सातबारा आठ ही कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही.
- शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मिळवण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक जमा केल्यानंतर शेतकऱ्यांची इतर माहिती आपोआप त्या ओळखपत्राच्या माध्यमातून घेतली जाईल.
- शेतकऱ्यांनी खरेदी केलेले बियाणे खते यांचा तपशील या क्रमांकाच्या माध्यमातून जतन करण्यात येईल
- शेतकऱ्यांना हमीभावाने पिकांची विक्री करताना देखील याच शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून त्या पिकाची नोंद आणि विक्री करता येणार आहे.
- कृषी विभाग अंतर्गत दिल्या जाणाऱ्या शेतकरी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी देखील शेतकऱ्यांना हे शेतकरी ओळख पत्र आवश्यक लागणार आहे.
- शेतकरी ओळखपत्र च्या माध्यमातून शेतकऱ्याचे आधार कार्ड शेतकऱ्याचे बँक खाते ही सर्व माहिती शेतकरी ओळख पत्र अशी सलग्न केली जाणार आहे.
- शेतकरी ओळखपत्राला आधार कार्ड आणि बँक पासबुक जोडल्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही शासकीय अनुदान आणि रक्कम मिळवण्यासाठी नव्याने कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही.
- यापुढे शेतकरी ओळखपत्राच्या आधारेच शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ देणे शासनाला सोयीचे होणार आहे.